पुण्यातील इन्फोसिस मध्ये ‘जिहादी छळ’चा गंभीर आरोप; माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर उडवली खळबळ
पुणे: नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथित प्रकरण अद्याप थंडावले नसतानाच, आता पुण्यातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस (Infosys) मध्ये मुलींवर होत असलेल्या ‘जिहादी छळ’चा धक्कादायक दावा समोर आला आहे. या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
माजी कर्मचाऱ्याने केला गंभीर आरोप
इन्फोसिसच्या एका माजी कर्मचाऱ्याने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत मोठा गंभीर आरोप केला आहे. या पोस्टमध्ये त्याने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांना टॅग करत प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, पुण्यातील इन्फोसिस बीपीएम मध्ये ‘डायम्लर’ या प्रकल्पावर काम करणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांना ‘जिहादी छळा’ चा सामना करावा लागत आहे. या छळात मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार केले जात असल्याचे त्याने म्हटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल,
ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींसह त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे हे महाराष्ट्राचे प्रमुख आयटी हब मानले जाते. अशा ठिकाणी अशा प्रकारचा आरोप समोर आल्याने संपूर्ण राज्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिक TCS प्रकरणानंतर आता पुणे
काही दिवसांपूर्वीच नाशिक येथील टीसीएस (TCS) कंपनीमध्येही अशाच प्रकारच्या आरोपांनी वातावरण तापवले होते. ते प्रकरण अद्याप समाधानकारकपणे मिटलेले नसतानाच आता पुण्यातील इन्फोसिसमधील या दाव्याने खळबळ वाढवली आहे.
हे पण वाचा
विराट हिंदू संमेलनास महिला वर्गाने मोठ्या संखेने उपस्थित राहावे – सौ. देवयानी काळे
सामाजिक वादातून माजी सरपंचाची कार जाळली ?
प्रशासन आणि कंपनीकडून प्रतिक्रिया नाही
या सर्व गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, अद्याप इन्फोसिस कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, राज्य सरकार किंवा पुणे पोलीस प्रशासनानेही या प्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि आमदार यांना थेट टॅग करण्यात आल्याने प्रशासन लवकरच या प्रकरणाची दखल घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या ही पोस्ट व्हायरल झाल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास लागला असता, अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.















