दिल्ली : दिल्ली येथे लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या तसेच सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरु आहे. मात्र शांततापूर्ण सुरु असलेल्या या आंदोलनाला सरकार तसेच दिल्ली पोलीस यांच्याकडूनच गालबोट लागल्याचं दिसत आहे. हजारोंच्या संख्येने सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांवर बेमालूम लाठीचार्ज तसेच अश्रूधूर सोडण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. नीट परीक्षेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाला पोलिसांनीच हिंस्त्र स्वरूप दिल्याचं पाहायला मिळतंय. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी या विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, लाठीचार्ज का?’ ही आपलीच मुलं आहेत असं म्हणत CJP आंदोलनावरून सरकारला प्रश्न विचारलाय. Priyanka gandhi
काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी CJP आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलिस कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, “देशासमोर अनेक गंभीर समस्या आणि मोठे मुद्दे आहेत. त्यावर चर्चा करण्याचीही सरकारची तयारी नाही. मात्र विद्यार्थ्यांवर अश्रुधूर सोडला जात आहे, त्यांना मारहाण केली जात आहे. अखेर असे का? ही आपलीच मुले आहेत.”
प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलनावरील पोलिस कारवाई आणि सरकारच्या भूमिकेवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे.
Jantar Mantar Ground delhi
Priyanka gandhi asked question to government











