महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची हलचाल?
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी खळबळ उडवली आहे. शिवसेना (शिंदे गट) च्या वरिष्ठ मंत्र्याने केलेल्या विधानानंतर राजकीय हलचाली तीव्र झाल्या आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट महिनाभरात मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ठाकरे गटात दुसरा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं कधी होणार ‘ऑपरेशन टायगर’?
सकाळपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा कोणत्याही ऑपरेशनच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी, त्यांच्याच गटातील मंत्र्यांनी वेगळेच संकेत दिले आहेत.
मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुम्हाला या महिन्याभरामध्ये हे ऑपरेशन टायगर आहे की आणखी काही आहे, हे कळेल.” त्यांच्या या विधानाने संपूर्ण राजकीय वातावरण तापले आहे.
शेवटच्या टप्प्यात असल्याचा दावा
शिरसाट यांनी ऑपरेशन कोणत्या टप्प्यात आहे, या प्रश्नाला उत्तर देताना मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “आता हे सगळं शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्हाला आता जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच याबद्दलचा स्फोट तुम्हाला उबाठामध्ये झालेला दिसेल.”
ही भूमिका अत्यंत सूचक मानली जात आहे. विशेष म्हणजे, यावेळी ऑपरेशन टायगरमध्ये प्रामुख्याने ठाकरे गटाचे खासदार टार्गेट असल्याची चर्चा आहे.
हे पण वाचा
‘कीव करा, पण आमचं ऑपरेशन सुरूच राहील’
ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’बद्दल कीव येत असल्याचे म्हटले होते. त्यावर शिरसाट यांनी तीव्र पलटवार केला. ते म्हणाले, “अरविंद सावंत तुम्ही कीव करत बसा. कीव करत बसता बसता अख्खा पक्ष फुटला. आमदार गेले, खासदार गेले, पदाधिकारी गेले.”
पुढे बोलताना त्यांनी ठणकावून सांगितले की, “तुमची कीव आता महाराष्ट्राला येत आहे. तुम्हाला कीव करायची असेल तर संजय राऊतची करा आणि त्या उबाठाची करा. आमचं जे ऑपरेशन आहे ते चालू राहील.”
एकनाथ शिंदेंकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे?
शिरसाट यांनी असा दावाही केला की, अनेक नेते स्वतःहून एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत आहेत. ते म्हणाले, “आम्ही कोणाशी संपर्क साधला नाही. स्वतःहून अनेकजण एकनाथ शिंदेंबरोबर संपर्क साधत आहेत. आमदार, खासदार आणि पदाधिकारी रोजच्या रोज एकनाथ शिंदेंकडे येत असतात.”
त्यांनी स्पष्ट केले की, कोणतेही ऑपरेशन बँडबाजा वाजवून केले जात नाही. योग्य वेळी निर्णय घेणे ही एकनाथ शिंदे यांची ख्याती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बारामती पोटनिवडणुकीवर काय म्हणाले?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबतही शिरसाट यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्हाला एवढेच माहीत होते की, सुनेत्रा वहिनींची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. अजितदादांचे योगदान बारामतीसाठी फार मोठे आहे.”
तसेच त्यांनी असेही सांगितले की, ‘तटकरे अपयशी की प्रफुल पटेल अपयशी’ या भानगडीत ते पडणार नाहीत.
पुढचा राजकीय स्टँड काय?
संजय शिरसाट यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातून आणखी कोणते मोठे नेते शिंदे गटात जाऊ शकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापणार आहे की नवे राजकीय समीकरण जुळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हे पण वाचा
Nashik IT Company Sex Racket : वेषांतर करून महिला पोलिसांची धाडसी कारवाई, 6 आरोपी अटकेत












