मोदींच्या संबोधनाकडे देशाचे लक्ष
नवी दिल्ली – लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मोठ्या प्रमाणात पराभव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आज रात्री ८.३० वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणात ते नेमके काय मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधेयक नामंजूर: सरकारला मोठा धक्का
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमताने नामंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडली. सभागृहात एकूण ५२८ खासदारांनी मतदान केले, मात्र विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मते (३५२) मिळवण्यात सरकारला अपयश आले. त्यासाठी आणखी ५४ मतांची कमी पडली.
या अपयशानंतर केंद्र सरकारने इतर दोन विधेयके पटलावर मांडण्याआधीच मागे घेतली. हा पराभव मोदी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
PM मोदी यांची विरोधकांवर तीव्र टीका
विधेयक फेटाळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोधी पक्षांवर निशाणा साधला. “विरोधकांनी आमचा पराभव केला नाही, तर महिलांच्या हक्कांचाच विरोध केला,” असे मोदी म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, विरोधकांची महिलांप्रतीची विचारसरणी अत्यंत नकारात्मक आहे आणि हा संदेश देशातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवला पाहिजे. तसेच, विरोधी पक्ष आता आपली भूमिका योग्य ठरवण्याचा आणि लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
रात्री ८.३० वाजता देशाला संबोधन
नेमक्या याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज रात्री ८.३० वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. या भाषणात ते महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच, विरोधी पक्षांवर काय टीका करतात आणि पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
हे पण वाचा
गर्भपाताच्या गोळ्याच्या अति सेवनाने तरुणीचा मृत्यू… वाचा सविस्तर
विरोधकांचा आरोप: सरकारचे ‘षड्यंत्र’
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सरकार मतदारसंघ पुनर्रचनेचे षड्यंत्र आखत असल्याचा दावा विरोधक करत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक पास होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजकीय वातावरण तापले
लोकसभेत झालेल्या या घडामोडींमुळे देशाचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महिला आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. पंतप्रधान मोदींचे आजचे संबोधन या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. देशवासी आणि राजकीय वर्तुळ या भाषणाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.














