Breaking news – Kuwait कुवेतमधून 20 भारतीय नागरिकांचे मृतदेह विशेष विमानाने केरळमधील कोची विमानतळावर दाखल झाले. पश्चिम आशियातील तणावामुळे उद्भवलेल्या विमानसेवा व्यत्ययांमुळे या मृतदेहांना मायदेशी आणण्यास विलंब झाला होता. मृतदेहांच्या आगमनामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. विमानतळावरून मृतदेह त्यांच्या मूळ गावी, केरळ आणि तामिळनाडूत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
केरळच्या कोची विमानतळावर मंगळवारी कुवेतमधून एक विमान आलं. पण या विमानातलं दृश्य हादरवणारं आणि भयावह होतं. कारण या विमानामध्ये एकही प्रवासी नव्हता, तर केवळ मृतदेहांनी भरलेलं हे विमान होत… एकसाथ तब्बल 20 लोकांचे मृतदेह. महत्वाचं म्हणजे हे सर्व मृतदेह भारतीयांचे आहेत. कुवेतमध्ये जीव गमावणाऱ्या या 20 भारतीयांचे मृतदेह मंगळवारी केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. सध्याची युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे हवाई सेवेत येणारे व्यत्यय यामुळे या लोकांचे मृतदेह मायदेशी आणण्यास बराच वेळ गेला. कोलंबोमार्गे कोची येथे कुवेत एअरवेजचे विशेष विमान KU5632 मंगळवारी दाखल झाले. मुळात हे विमान प्रवाशांसाठी नव्हे तर केवळ भारतीय मृतदेह आणण्यासाठी चालवले गेले होते. त्या विमानात एकही प्रवासी बसलेला नव्हता, मृतदेह असलेल्या या विमानातील डेडबॉडीजमुळे सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. 20 dead-bodies of indian citizens
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये कुवेतमध्ये विविध घटना घडल्या. ज्यात २० भारतीय मृत्युमुखी पडले होते. महत्वाचं म्हणजे तेथील सुरु असलेल्या युद्धाचा या घटनांशी संबंध नाही. मात्र, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकात व्यत्यय आल्याने हे मृतदेह पाठवण्यास बराच विलंब झाला होता. आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचं दु:ख त्यांचे कुटुंबीय सहन करत असतानाच, मृतदेह आणण्यासही वेळ लागल्यामुळे परिस्थिती आणखीनच हृदयद्रावक झाली.
कुवेतहून आलेलं हे विमान कोची एअरपोर्टवर उतरले त्यानंतर सर्व 20 मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मृतांमध्ये बहुतेक जण केरळमधील कोझिकोड, अलाप्पुझा आणि कोट्टायम या जिल्ह्यांचे रहिवासी होते. याव्यतिरिक्त, रस्तेमार्गाने काही मृतदेह तामिळनाडूलाही पाठवायचे असून, त्यासाठी आवश्यक असणारी रुग्णवाहिका तसेच इतर व्यवस्था आधीच करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
कुवेतमध्ये आखाती देशांच्या युद्ध परिस्थितीमुळे भारतीयांचे तब्बल २० मृतदेह अडकले होते. हे मृतदेह त्यांच्या मायभूमीत येणं बऱ्याच काळापासून प्रलंबित होतं. मध्य-पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे, कुवेतहून सुरु असलेली हवाई सेवा विस्कळीत झाली होती. ज्यामुळे त्या नागरिकांचे मृतदेह मायदेशी परत येण्यास विलंब झाला होता. शेवटी काल हे विमान भारतात आलं आणि सर्व औपचारिकता पूर्ण करत हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत अशी माहिती पीटीआय या संस्थेकडून प्राप्त झाली आहे.













